शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

पाकिस्तानातून कच्ची साखर आयात करून देशातील साखरेचे दर पाडले -राजू शेट्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2018 23:06 IST

‘पाकिस्तानवर टीका करताना, त्यांच्यावर कारवाई केल्यावर सर्वांचीच छाती फुगते; मात्र छप्पन इंच छाती असलेल्यांनी पाकिस्तानमधून साखर आयात करताना हा विचार का केला नाही. कमी दरात कच्ची साखर आयात करून

ठळक मुद्दे केंद्र सरकारच्या धोरणामुळे लुच्छे दिन आल्याचा आरोप

फलटण : ‘पाकिस्तानवर टीका करताना, त्यांच्यावर कारवाई केल्यावर सर्वांचीच छाती फुगते; मात्र छप्पन इंच छाती असलेल्यांनी पाकिस्तानमधून साखर आयात करताना हा विचार का केला नाही. कमी दरात कच्ची साखर आयात करून देशात उत्पादित साखरेचे दर पाडले. केंद्र सरकार व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे दळभद्र्री धोरण शेतकरी विरोधी आहे. यामुळे शेतकऱ्यांसह आम्हालाही ‘अच्छे दिनाच्या शोधात लुच्छे दिन आले आहेत,’ अशी टीका खासदार राजू शेट्टी यांनी केली.साखरवाडी येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे आयोजित आक्रोश मेळाव्यात ते बोलत होते.

यावेळी पुणे जिल्हाध्यक्ष राजेंद्र ढवाण (पाटील), महाराष्ट्र प्रदेश युवा आघाडीचे अध्यक्ष अमर कदम, युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष धनंजय महामुलकर, डॉ. रवींद्र घाडगे, फलटण तालुकाध्यक्ष नितीन यादव, शहराध्यक्ष सचिन खानविलकर, अनिल पिसाळ उपस्थित होते.राजू शेट्टी म्हणाले, ‘केंद्र व राज्य सरकारने टोमॅटोचे भाव आपल्या देशात दर एक ते दीड रुपये असताना पाकिस्तानमध्ये टोमॅटो तीनशे रुपयांपर्यंत पोहोचला. यावेळी काही शेतकºयांनी टोमॅटो पाकिस्तानमध्ये पाठवण्याचा प्रयत्न केला. पाकिस्तानने भारतातील टोमॅटो येऊ न देण्यासाठी ठिकठिकाणी चौक्या लावल्या. यामुळे आपल्या देशातील शेतकºयांना हा टोमॅटो रस्त्यावर फेकून द्यावा लागला होता. सरकार शेतकºयांचेच सर्जिकल स्ट्राइक करीत असून, आता आपले उसाचे पैसे व दुधाचे पाच रुपये अनुदान घेतल्याशिवाय केंद्रासह राज्यातील एकाही मंत्र्याला रस्त्यावर फिरून देणार नाही,’ असा इशारा खासदार राजू शेट्टी यांनी दिला.

कारखानदार साखर उताºयाची एका बाजूला चोरी करतात व दुसºया बाजूला साखर उताºयातील चोरीची साखर काळ्या बाजारात विकून त्याचे सर्व पैसे हडप करतात. यामुळे साखर उतारा कमी दाखवून ऊस उत्पादकांची दिशाभूल करतात. उतारा कमी का झाला? याचा जाब शेतकरी विचारत नाहीत, यामुळे साखर धंद्यात पांढरे बोके काळी कमाई करून शेतकºयांना लुबाडत आहेत. शेतकरी मात्र कर्जात अडकला आहे.एकीकडे कामगार मिळत नसल्याने काही वेळेला ऊस तोडणीसाठी पैसे द्यावे लागतात. यामुळे शेतकºयांच्या मुलांनी एकत्र येऊन ऊसतोडीच्या मशिनरी खरेदी केल्या. मात्र यासाठी अनुदान मिळत नसल्याने तेही आता अडचणीत आले.

 

टॅग्स :Satara areaसातारा परिसरRaju Shettyराजू शेट्टी